वैजापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करा- भाजपचे डॉ.दिनेश परदेशी यांची मागणी
वैजापूर ,४ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- अतिवृष्टीमुळे वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.पुराच्या पाण्यामुळे शेतजमिनीसह पिके वाहून गेली असून,अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदशी यांनी केली आहे.
तालुक्यातील बोरसर व परिसरातील सोनवाडी,उंदीरवाडी आदी गावांना भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी यांनी शनिवारी (ता.2) भेटी देऊन शेतकऱ्यांचे नुकसानीची पाहणी केली.
शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांना धीर दिला.शासनाने सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.अशी मागणी डॉ.दिनेश परदेशी यांनी यावेळी केली.