आमदार अंबादास दानवे व आ. रमेश पाटील बोरणारे यांनी केली शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी

वैजापूर ,२ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-अतिवृष्टीमुळे तालुक्यातील ढेकू व बोर नद्यांना पूर येऊन या पुरामुळे बाधित झालेल्या गावांना शिवसेना आमदार अंबादास दानवे व आ. रमेश पाटील बोरणारे यांनी शुक्रवारी भेटी देऊन शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली.शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन देऊन शेतकऱ्यांना धीर दिला.या भेटीत आ.दानवे यांनी तालुक्यातील बोरसर व शिऊर परिसरातील निमगांव,खरज,चिकटगांव,लोणी खुर्द,बाभूळतेल,नायगव्हान आदी गावांमध्ये दौरा करून अतिपाऊस व नदीच्या पुरामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली.                   

शेतकरी व ग्रामस्थांशी चर्चा करून झालेल्या नुकसानीची माहिती आ दानवे व आ. बोरणारे यांनी घेतली व शेतकऱ्यांना धीर दिला.तलाठी,ग्रामसेवक व सर्व अधिकारी गावनिहाय नुकसानीचे पंचनामे करत असून,शेतकऱ्यांनी देखील त्यांना याकामी मदत करावी.असे आ.दानवे यांनी यावेळी सांगितले.यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगांवकर, बाबासाहेब पाटील जगताप,जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती अविनाश पाटील गलांडे,  शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन वाणी, रामहरी जाधव, बाजार समितीचे उपसभापती राजेंद्र चव्हाण,नंदकुमार जाधव,गोरख आहेर,प्रभाकर जाधव,अंबादास खोसे, भिकन सोमासे  आदी उपस्थित होते.