येलदरी धरणाचे 10 दरवाजे उघडले,नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे
पुलावरून पाणी वाहत असल्याने दिवसभर वाहतूक बंद
जिंतूर ,२९ सप्टेंबर /प्रतिनिधी :-
जिंतूर पासून 15 किमी.अंतरावर असलेल्या येलदरी धरणाचे 10 दरवाजे उघडल्याने धरणा समोरील पुलावरून पाणी वहात आहे या मुळे या पुलावरून आज दिवसभर वाहतूक बंद राहिली. विदर्भाकडे जाणाऱ्या अकोला, रिसोड, वाशीम,या पैकी एकही बस धावू शकली नाही दिवसभर दरवाजे उघडेच होते व पाण्याचा विसर्ग सुरूच राहिला.
येलदरी धरण विसर्ग
आज सकाळी 10.30 वाजता धरणाचे Spillway gate क्र. 1,5,6 व 10 हे 1.5 m वाढवून एकुण (गेट नं.1,3,5,6,8,10-3 m आणि गेट नं.2,3,4,7,8,9-2 m ) त्याद्वारे 100561.50 cusecs (2847.60 Cumecs ) विसर्ग पूर्णा नदीपात्रात सोडण्यात येईल.
सद्यस्थितीत पूर्णा नदीपात्रात ( Spillway gate – 100561.50 Cusecs + Hydro power -2700 Cusecs ) असा एकुण 103261.50 Cusecs (2924.055 Cumec) विसर्ग चालू असेल