न्यायमुर्ती सुनील देशमुख यांना औरंगाबाद खंडपीठ वकील संघातर्फे निरोप समारंभ
औरंगाबाद,२७ सप्टेंबर/प्रतिनिधी :- मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमुर्ती सुनील देशमुख हे नुकतेच सेवानिवृत्त झाले असून, त्यांचा खंडपीठ वकील संघातर्फे सत्कार करण्यात आला. प्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती दिपांकर दत्ता, वकील संघाचे अध्यक्षा सुरेखा महाजन, सचिव- शहाजी घाटोळ-पाटील इतयादी मंचावर उपस्थित होते.
वकील संघातर्फे सचिव शहाजी घाटोळ पाटील यांनी न्यायमुर्ती श्री. सुनील देशमुख यांचा सत्कार केला. सुरेखा महाजन यांनी प्रास्तावीक केले व वकील संघाचे जेष्ठ वकील सिनीअर वकीलांनी भाषणात न्यायमुर्ती सुनील देशमुख यांचे न्यायिक कारकीर्दीतील कामाबद्दल गौरव केला. प्रसंगी मुख्य न्यायमुर्ती श्री. दिपांकर दत्ता यांनी नमूद केले की, जेष्ठ विधिज्ञ पी.आर. देशमुख यांचा वारसा कायम ठेवून उच्च कोटीचे व वाखाखण्याजोगे काम केले आहे. त्यांनी सदैव निपक्षपणे , संयमाने, हसतमुख राहून, ताण -तणाव न जुमानता न्यायदानाचे कामकाज केले. सत्काराला उत्तर देतांना न्यायमुर्ती सुनील देशमुख यांनी नमूद केले की, त्यांचे न्यायिक कारकीर्दीत पदाला मान देवून, जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न केला व त्यांच्या कारकिर्दीत वकील, कर्मचारी ,अधिकारी तसेच इतर सहकारी न्यायमुर्ती, कुटूंबीय यांनी केलेल्या सहका-याबद्दल धन्यवाद व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन अनघा पेडगावकर यांनी केले व आभार प्रदर्शन वकील संघाचे सचिव शहाजी घाटोळ पाटील यांनी केले. सदर निरोप समारंभ कोवीड-११ चे नियमांचे पालन करुन शिस्तीत झाला. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अशफाक पटेल, अनुराधा मंत्री, इराळे पाटील, अलमास शेख रियास, संजय नामदुरे, राज ढवारे, राकेश जैन, बळीराम शिंदे, राघवेंद्र भिसे, मुकेश राठोड,पुजा पाटील, वैभव देशमुख, वैभव पवार, स्वप्नील दरगड, मोईनोद्यीन शेख यांनी सहकार्य केले.