रस्त्याच्या कामाची चौकशीसाठी शिवराई येथे ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन

वैजापूर ,२३ सप्टेंबर /प्रतिनिधी :- बेलगांव ते लासुर चौक या रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधित अभियंता व गुत्तेदार  यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावे.या मागणीसाठी आज सकाळी 11 वाजता शिवराई ता.वैजापूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Displaying IMG-20210923-WA0091.jpg

भाजपचे कार्यकर्ते तथा औरंगाबाद जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष कचरू पाटील -डिके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या रास्तारोको आंदोलनात शिवराई,परसोडा,सवंदगाव,गोलवाडी,दहेगाव,करंजगाव,पालखेड, लासुरगाव,कनकसागज,तिडी, बेंदवाडी या गावांतील नागरिकांनी सहभाग घेतला.यासंदर्भात उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एप्रिलमध्ये बेलगांव ते लासुर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले. या रस्त्याच्या दुरुस्ती व डांबरीकरण कामावर सुमारे ३२ कोटी रुपये खर्च दाखविण्यात आला आहे.  मात्र हा रस्ता दोन महिन्यातच खराब झाला. या रस्त्यावर पांच ते सात फूट खोल खड्डे पडले असून, या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्यावर अनेक अपघात होऊन त्यामध्ये प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामावर ३२ कोटी रुपये एव्हढा मोठा खर्च करूनही रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

Displaying IMG-20210923-WA0076.jpg

या प्रकरणी चौकशी करून संबंधित अभियंता व ठेकेदार यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावे.अशी मागणी  निवेदनात करण्यात आली आहे.