पंतप्रधानांनी नागरिकांना स्मृतिचिन्हांच्या लिलावात सहभागी होण्याचे केले आवाहन

नवी दिल्ली, १९ सप्टेंबर /प्रतिनिधी :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेटवस्तू आणि स्मृतिचिन्हांच्या लिलावात नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, ही रक्कम नमामि गंगे उपक्रमाला दिली जाणार आहे.

“मला वेळोवेळी अनेक भेटवस्तू आणि स्मृतिचिन्ह मिळाली आहेत, ती लिलावासाठी ठेवली जातील, यामध्ये आमच्या ऑलिम्पिकमधील चमकत्या ताऱ्यांनी दिलेल्या विशेष स्मृतिचिन्हांचा समावेश आहे. या लिलावामध्ये सहभागी व्हा. लिलावातील रक्कम पुढे नमामि गंगे उपक्रमासाठी दिली जाणार आहे.“