औरंगाबाद जिल्ह्यात 30 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात एक लक्ष 44 हजार 463 कोरोनामुक्त, 221 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद,७ सप्टेंबर /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात आज 19 जणांना (मनपा 12, ग्रामीण 07) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 44 हजार 463 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 30 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 48 हजार 228 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 544 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 221 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (13) नागेश्वरवाडी 1, सिडको 1, देवळाई 1, सम्राट नगर 1,अन्य 09

ग्रामीण (17) औरंगाबाद 03 गंगापूर 03 , वैजापूर 10, खुलताबाद 01

मृत्यू (01)

घाटी (01) 1. 60 स्त्री,सावखेडा शिरुर,औरंगाबाद