औरंगाबाद जिल्ह्यात 12 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात एक लक्ष 44 हजार 403 कोरोनामुक्त, 210 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद,४ सप्टेंबर /प्रतिनिधी :-औरंगाबाद जिल्ह्यात आज 18 जणांना (मनपा 8, ग्रामीण 10 ) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 44 हजार 403 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 12 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 48 हजार 153 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 540 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 210 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (01) अन्य 1

ग्रामीण (11) औरंगाबाद 3, गंगापूर 1, वैजापूर 6, पैठण 1

मृत्यू (04)

घाटी (04) 1. 58 स्त्री, चित्तेगाव2. 74,स्त्री, शिऊर, वैजापूर3. 72, पुरूष, तांदूळवाडी, गंगापूर4. 43, पुरूष, भेंडाळा, औरंगाबाद