औरंगाबाद जिल्ह्यात 29 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात एक लक्ष 44 हजार 318 कोरोनामुक्त, 192  रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद,३० ऑगस्ट /प्रतिनिधी :-  औरंगाबाद जिल्ह्यात आज 14 जणांना (मनपा 08, ग्रामीण 06 ) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 44  हजार 318 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 29 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 48 हजार 040 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 530 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 192 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा ( 11)

उस्मानपुरा 1, सिडको 1, एस.आर.पी.एफ कॅम्प 1, हडको 1, घाटी परिसर 2, अन्य 5

ग्रामीण (18)

गंगापूर 8, खुलताबाबद 2, सिल्लोड 2, वैजापूर 5, पैठण 1

मृत्यू (01)

घाटी (01)

1.60 पुरुष, शिरसगाव ता.वैजापूर