दिलासा:औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा एकही मृत्यू नाही

जिल्ह्यात एक लक्ष 44 हजार 182 कोरोनामुक्त, 151 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद,२२ऑगस्ट /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात आज 26 जणांना (मनपा 06, ग्रामीण 20) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 44 हजार 182 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 13 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 47 हजार 859 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 526 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 151 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (07) भगतसिंग नगर (2), मयूर पार्क (1), एकनाथ नगर (1), हर्सुल कारागृह परिसर (1), ठाकरे नगर (1), घाटी परिसर (1)

ग्रामीण (06) औरंगाबाद (1), गंगापूर (1), वैजापूर (3), पैठण (1)