औरंगाबाद जिल्ह्यात 13 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात एक लक्ष 43 हजार 867 कोरोनामुक्त, 243 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद,९ऑगस्ट /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात आज 21 जणांना (मनपा 05, ग्रामीण 16) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 43 हजार 867 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 13 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 47 हजार 623  झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 513 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 243 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

 मनपा (02)

ठाकूर नगर 1, विठ्ठल नगर 1

ग्रामीण (11)

गंगापूर 4, सिल्लोड 1,  पैठण 3, वैजापूर 3

मृत्यू (01)

घाटी (01)

1.      70 स्त्री,  ता.वैजापूर