औरंगाबाद जिल्ह्यात 30 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर
जिल्ह्यात एक लक्ष 43 हजार 770 कोरोनामुक्त, 300 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद, ६ऑगस्ट /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात आज 25 जणांना (मनपा 07, ग्रामीण 18) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 43 हजार 770 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 30 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 47 हजार 581 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 511 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 300 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
मनपा (07)
औरंगाबाद परिसर 1, एन-9 येथे 2, बीड बायपास 1, सातरा परिसर 1, छत्रपती नगर 1, मिल्ट्री हॉस्पीटल छावणी 1
ग्रामीण (23)
औरंगाबाद 1, फुलंब्री 1, गंगापूर 1, कन्नड 1, खुलताबाद 1, वैजापूर 15, पैठण 3
मृत्यू (02)
घाटी (01)
1. 82 पुरुष, मनूर, ता.वैजापूर
खासगी (01)
1. 51 पुरुष, विरगाव, ता.वैजापूर