औरंगाबाद जिल्ह्यात 28 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात एक लक्ष 43 हजार 550 कोरोनामुक्त, 304 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद,२९ जुलै /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात आज 37 जणांना (मनपा 07, ग्रामीण 30) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 43 हजार 550 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 28 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 47 हजार 344 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 490 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 304 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (05) उल्कानगरी 1, रायगड नगर 1, एकनाथ नगर 1, नंदनवन कॉलनी 2

ग्रामीण (23) औरंगाबाद 4, गंगापूर 2, सिल्लोड 1, वैजापूर 14, पैठण 2