औरंगाबाद जिल्ह्यात 32 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात एक लक्ष 43 हजार 484 कोरोनामुक्त, 292 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद,२७जुलै /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात आज 32 जणांना (मनपा 03, ग्रामीण 29) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 43 हजार 484 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 32 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 47 हजार 265 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 489 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 292 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (10) नवजीवन कॉलनी 1, टी.व्ही.सेंटर 1, हडको कॉर्नर 1, सातारा परिसर 1, छत्रपती नगर 1, गारखेडा परिसर 1, अन्य 4

ग्रामीण (22) औरंगाबाद 9, गंगापूर 5, कन्नड 1, वैजापूर 5, पैठण 2

मृत्यू (01)

घाटी (01) 1. 65,स्त्री, रांजणगाव, औरंगाबाद