औरंगाबाद जिल्ह्यात 28 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात एक लक्ष 43 हजार 452 कोरोनामुक्त, 293 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद,२६जुलै /प्रतिनिधी :-औरंगाबाद जिल्ह्यात आज 34 जणांना (मनपा 03, ग्रामीण 31) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 43 हजार 452 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 28 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 47 हजार 233 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 488 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 293 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (04) उस्मानपुरा (1), उल्कानगरी (1), अन्य (2)

ग्रामीण (24)औरंगाबाद (1), फुलंब्री (1), कन्नड (1), सिल्लोड (2), वैजापूर (7), पैठण (12)

मृत्यू (03)

घाटी (02) 1. 27,पुरुष, कायगाव, औरंगाबाद2. 48,पुरुष, विष्णू नगर, औरंगाबाद

खासगी (01) 1. 53, पुरुष, बजाज नगर