कारगिल विजय दिवसानिमित्त हुतात्मा वीरांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले वंदन

नवी दिल्ली,२६जुलै /प्रतिनिधी :- कारगिल विजय दिवसानिमित्त, देशाचे संरक्षण करण्यासाठी ज्यांनी प्राणांची आहुती दिली, त्या हुतात्मा वीरांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदन केले आहे.

“आपण त्यांच्या बलिदानाचे स्मरण करतो.

आपण त्यांच्या शौर्याचे स्मरण करतो.

आज, कारगिल विजय दिवसानिमित्त, देशाचे संरक्षण करण्यासाठी ज्यांनी प्राणांची आहुती दिली, त्या हुतात्मा वीरांना वंदन करतो. त्यांचे शौर्य आपल्याला रोज प्रेरणा देत असते.

गेल्या वर्षीच्या ‘मन की बात’ मधील काही अंश देखील शेअर करतो आहे.”, असे पंतप्रधानांनी एक ट्विट मध्ये म्हंटले आहे.