औरंगाबाद जिल्ह्यात 28 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात एक लक्ष 43 हजार 355 कोरोनामुक्त, 275 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद,२२ जुलै /प्रतिनिधी:-औरंगाबाद जिल्ह्यात आज 26 जणांना (मनपा 03, ग्रामीण 23) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 43 हजार 355 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 28 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 47 हजार 110 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 480 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 275 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.  

मनपा (09) विवेकानंद नगर 1, आदर्श कॉलनी ठाकरे नगर 2, अन्य 6,  

ग्रामीण (19) गंगापूर 2, कन्नड 7, वैजापूर 7, पैठण 2, सोयगाव 1,
मृत्यू (02) घाटी (02)1. 38,पुरुष,वैजापूर 2. 60, पुरुष, अकोली वडगाव वैजापूर