औरंगाबाद जिल्ह्यात 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात एक लक्ष 43 हजार 329 कोरोनामुक्त, 275 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद,२१ जुलै /प्रतिनिधी :-   औरंगाबाद जिल्ह्यात आज 38 जणांना (मनपा 04, ग्रामीण 34) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 43 हजार 329 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 47 हजार 82 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 478 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 275 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
 मनपा (09) नाशिक रोड परिसर (1), उल्का नगरी (2), ठाकरे नगर (1), गोलटगाव (1), एन बारा, हडको (1), घाटी परिसर (1), अन्य (2) 

ग्रामीण (17) औरंगाबाद (01), गंगापूर (05), कन्नड (01), वैजापूर (09), पैठण (01)
मृत्यू (01)
घाटी (01) 1. 35, पुरूष, पोरगाव, पैठण