औरंगाबाद जिल्ह्यात 30 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर
जिल्ह्यात एक लक्ष 43 हजार नऊ कोरोनामुक्त, 301 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद, १३जुलै /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात आज 43 जणांना (मनपा 15, ग्रामीण 28) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 43 हजार नऊ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 30 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 46 हजार 771 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 461 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 301 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
मनपा (08) कमल नयन बजाज हॉस्पीटल परिसर 1, पुडंलिक नगर 1, उल्का नगरी 1,मुकुंद नगर 2, अन्य 3
ग्रामीण (22) औंरगाबाद 1, फुलंब्री 2, गंगापूर 2, वैजापूर 14, पैठण 3
मृत्यू (02)
घाटी (02) 1.55,पुरुष, शिरुर बंगला, वैजापूर 2.55, स्त्री, उमरावती, फुलंब्री