औरंगाबाद जिल्ह्यात 38 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात एक लक्ष 42 हजार 833 कोरोनामुक्त, 395 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद,१०जुलै /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात आज 78 जणांना (मनपा 15, ग्रामीण 63) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 42 हजार 833 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 38 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 46 हजार 684 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 456 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 395 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (13)

शिवाजी नगर 1, सुधाकर नगर 1, देवगिरी मुलींचे वसतिगृह 1, अन्य 10

ग्रामीण (25)

औरंगाबाद 2, फुलंब्री 3, गंगापूर 2, कन्नड 5, वैजापूर 9, पैठण 4

मृत्यू (05)

घाटी (04) 1. पुरुष/39/चिंचवन, सिल्लोड2. पुरुष/75/डोनवाडा तांडा, फुलंब्री3. स्त्री/70/पळसवाडी, खुलताबाद5. स्त्री/50/आंबा, कन्नड.

जिल्हा सामान्य रुग्णालय (1) 1. स्त्री/65/मीरखेड, पैठण