औरंगाबाद जिल्ह्यात 48 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात एक लक्ष 42 हजार 620 कोरोनामुक्त,463 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद,७जुलै /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात आज 49 जणांना (मनपा 12, ग्रामीण 37) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 42 हजार 620 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 48 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 46 हजार 528 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 445 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 463 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (19) घाटी 1, ईटखेडा पैठण रोड 1, संदेश नगर 2, धूत हॉस्पीटल जवळ 1, एन-7 येथे 1, सातारा परिसर 2, एसआरपीएफ कॅम्प 1, चिकलठाणा 1, जय भवानी नगर 1, अन्य 8

ग्रामीण (29) औरंगाबाद 2, गंगापूर 8, खुलताबाद 1, वैजापूर 15, पैठण 3,

मृत्यू (02)

घाटी (02)1. स्त्री/28/पैठण, औरंगाबाद.2. स्री/80/ शंभू नगर, गादिया विहार, औरंगाबाद.