औरंगाबाद जिल्ह्यात 90 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात एक लक्ष 42 हजार 132 कोरोनामुक्त, 650 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद,३०जून /प्रतिनिधी :-  औरंगाबाद जिल्ह्यात आज 110 जणांना (मनपा 25, ग्रामीण 85) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 42 हजार 132 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 90 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 46 हजार 208 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 426 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 650 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 

मनपा (19)औरंगाबाद 1, किर्ती हाऊसिंग सोसायटी एन-8 येथे 1, जय भवानी नगर 1, टीव्ही सेंटर 1, पैठण गेट 1, सिडको 1, पडेगाव 1, पानचक्की 1, अन्य 11
ग्रामीण (71)अन्य 71
घाटी (01)1. 40/ स्त्री / अडगाव, कन्नड