औरंगाबाद जिल्ह्यात 76 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात एक लक्ष 41 हजार 681 कोरोनामुक्त, 829 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद,२६ जून /प्रतिनिधी :-औरंगाबाद जिल्ह्यात आज 99 जणांना (मनपा 20, ग्रामीण 79) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 41 हजार 681 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 76 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 45 हजार 923 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 413 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 829 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
मनपा (19)
घाटी परिसर (3),एन -4 सिडको(1), चिकलठाणा (1), नारेगाव (1), श्रेय नगर (2) अन्य (11)
ग्रामीण (57)
कन्नड (1), वाळूज (1), अन्य (55)
कोरोनाबाधितांचा मृत्यू (4)
घाटी (3)

  1. पुरूष, 77, फुलंब्री
  2. स्त्री, 45, मिसारवाडी
  3. पुरूष, 70, पेडगाव,फुलंब्री
    खासगी रूग्णालय (1)
  4. पुरूष, 50, इंदेगाव, ता. पैठण