औरंगाबाद जिल्ह्यात 66 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात एक लक्ष 41 हजार 582 कोरोनामुक्त, 856 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद,२५जून /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात आज 112 जणांना (मनपा 20, ग्रामीण 92) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 41 हजार 582 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 66 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 45 हजार 847 झाली आहे. आजपर्यंत एकूण 3409  जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 856 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (13)

औरंगाबाद 1, कटकट गेट 1, राजे संभाजी कॉलनी 1, एन-3 येथे 1, जाधववाडी 1, भारत नगर ब्रिजवाडी 1, एन-4 येथे 1, श्रेय नगर 1, मुकुंदवाडी 1, निंरकार नगर 1, अन्‌य 03

ग्रामीण (53)

किनगाव, ता.फुलंब्री 1, पळसवाडी ता.औरंगाबाद 1, अन्य 51

मृत्यू (03)

घाटी (02)

1.         पुरूष/44/मोढा, ता.गंगापूर, जि.औरंगाबाद.

2.         स्त्री/65/वैजापूर, जि.औरंगाबाद.

खासगी रुग्णालय (01)

1.         स्त्री/46/चिंचोली ता.कन्नड, जि.औरंगाबाद.