सायकलपटू संतोष बालगीर यांचा सत्कार

औरंगाबाद ,१६जून /प्रतिनिधी :- संजीवनी सफर या मोहिमेअंतर्गत जागतिक वारसा स्थळांचे संवर्धन व संरक्षण तसेच भारतीय सैनिकांना मानवंदना हा संदेश घेऊन संतोष बालगीर हे गेल्या 20 डिसेंबर 2020 पासून लातूर येथून भारत भ्रमंतीवर आहेत.

Displaying IMG-20210615-WA0086.jpg

त्यांनी महाराष्ट्र कर्नाटक केरळ तामिळनाडू पांडेचरी आंध्र प्रदेश तेलंगाना मध्य प्रदेश उत्तर प्रदेश दिल्ली हरियाणा पंजाब जम्मू आणि काश्मीर हिमाचल प्रदेश हरियाणा राजस्थान गुजरात मार्गे महाराष्ट्र अशा अकरा हजार नऊशे किलोमीटरचा प्रवास सायकलवर केलेला असून  ते 177व्या दिवशी औरंगाबाद येथे आलेले आहेत.या त्यांच्या यशस्वी मोहिमेचा गौरव म्हणून मंगळवार दिनांक 15 जून रोजी निसर्ग मित्र मंडळाचे सचिव किशोर गठडी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

Displaying IMG-20210615-WA0083.jpg

या प्रसंगी श्री संतोष बालगीर यांनी या सायकल  वरील त्यांच्या साहसी अभियानात देशाच्या विविध प्रातांत आलेले अनेक अदभूत अनुभव चर्चेद्वारे  उपस्थित मान्यवरासोबत सामायिक केले या प्रसंगी निसर्ग मित्र मंडळाचे प्र रं पानसे, नागेश देशपांडे, महेंद्र देशमुख, अँड.सुनील बोरा,अँड धाबेकर, संजीव महल्ले,क्षितिज गठडी,मिहीर दीक्षित,वैभव गाडेकर आदी निसर्ग मित्रमंडळाचे स्वयंसवेक उपस्थित होते