कोविडसंदर्भात राज्यात १ लाख २९ हजार गुन्हे दाखल; ७ कोटी ४५ लाखांचा दंड – गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई दि.१४- लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ७८ हजार १८२ पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच ६ लाख ११ हजार व्यक्तींना क्वारंटाईन (Quarantine) करण्यात आले आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
राज्यात लॉकडाऊनच्या काळात (दि.२२ मार्च ते १३ जून या कालावधीत) कलम १८८ नुसार १ लाख २९ हजार ४२४ गुन्हे नोंद झाले असून २६ हजार ६४० व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ७ कोटी ४५ लाख ६९ हजार ५५१ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – २६५ (८४९ व्यक्ती ताब्यात)
१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख ०३ हजार १७
राज्यात एकूण क्वारंटाईन केलेल्या व्यक्ती – ६ लाख ११ हजार ५०२
अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे –१३३३
जप्त केलेली वाहने – ८२ हजार १६८
परदेशी नागरिकांवर व्हिसा उल्लंघनाचे नोंदवलेले गुन्हे – १५
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस – ३९
(मुंबईतील २४ पोलीस व १ अधिकारी असे एकूण २५, पुणे २, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण ३, एटीएस १, मुंबई रेल्वे २, ठाणे ग्रामीण २, जळगाव ग्रामीण१,पालघर १)
कोरोना बाधित पोलीस – २०० पोलीस अधिकारी व ११७७ पोलीस कर्मचारी.
राज्यातील एकूण रिलिफ कँप -१५८. (सुमारे ४ हजार ८६१लोकांची व्यवस्था)