दिलासादायक! राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर; तीन महिन्यानंतर आज प्रथमच सर्वात कमी कोरोना रुग्णांचे निदान

मुंबई ,५ जून /प्रतिनिधी:- राज्याचे  कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) गेल्या तीन महिन्यात आज प्रथमच ९५ टक्क्यांवर गेले आहे. आज दिवसभरात कोरोनाचे २१ हजार ७७६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. आतापर्यंत एकूण ५५ लाख २८ हजार ८३४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान, तीन महिन्यात आज प्रथमच सर्वात कमी १३ हजार ६५९ कोरोना रुग्णांचे निदान झाले. दि. १० मार्च २०२१ रोजी  आजच्या इतकेच रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर सातत्याने दैनंदिन रुग्ण संख्या वाढत होती.राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस कमालीची घट पाहायला मिळत आहेत. गेल्या 2 महिन्यात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातलं होतं. मात्र आता आरोग्य यंत्रणांच्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. राज्यात आज (5 जुलै) 13 हजार 659 नवे कोरोना बाधित सापडले आहेत. तर 24 तासात 21 हजार 776 रुग्ण बरे झाले आहेत. तर 300 जणांचा दिवसभरात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

सध्या राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या देखील  १  लाख ८८ हजार ०२७ इतकी झाली आहे.राज्यात आजपर्यंत एकूण 55 लाख 28 हजार 834 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 1 लाख 88 हजार 27 इतके सक्रीय रुग्ण आहेत. म्हणजेच या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate)  95.01% इतके झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर 1.71% एवढा आहे. सध्या राज्यात 14,00,052 व्यक्ती या होम क्वारंटाईन आहेत. तर 7 हजार 93 जणं संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

  • राज्यात आज ३०० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर १.७१ टक्के एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ६२ लाख ७१ हजार ४८३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८ लाख १९ हजार २२४ (१६.०४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात १४,००,०५२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ७,०९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.