कोविड-19 संसर्ग साखळी तोडणे:अत्यावश्यक व्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु

औरंगाबाद महापालिकासह जिल्हयात सर्व शासकीय कार्यालये 25% अधिकारी/कर्मचारी उपस्थितीत सुरु राहतील.

 रेस्टॉरंट/हॉटेल,,बार व मद्य विक्रीची दुकाने ही फक्त पार्सल / घरपोच सेवेसाठी

औरंगाबाद ,३१ मे /प्रतिनिधी:- शासनाने कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या इतर सर्व सक्षम तरतुदींसह साथीच्या रोग अधिनियम, 1897 मधील कलम 2 अन्वये दि. 30 मे, 2021 रोजीच्या आदेशानुसार दिनांक 01 जून  2021  रोजी सकाळी 7.00 पासून दिनांक 15 जून 2021 च्या सकाळी 07.00 वाजेपर्यंत कोविड-19 प्रतिबंधक उपाययोजना राबविण्याचे निर्देशित केले आहे. सुधारित आदेशानुसार कोविड-19 संसर्ग साखळी तोडणे (Break the Chain) सुधारित अटी व शर्ती अंमजबजावणीस्तव विविध आदेश निर्गमित केलेले असून त्यात  16 एप्रिल आणि 12 मे 2021 मधील इतर सर्व बाबी कायम ठेवण्यात आलेल्या असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.  
पोलीस आयुक्त, औरंगाबाद शहर, प्रशासक, औरंगाबाद महानगरपालिका व जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, औरंगाबाद यांच्या संयुक्त स्वाक्षरीने  औरंगाबाद शहर व जिल्हा क्षेत्राकरिता दिनांक 01 जून 2021 रोजीचे सकाळी 07.00 वाजेपासून 15 जून 2021 रोजी सकाळी 7.00 वाजेपर्यंत  खालील बाबी  हया संपूर्ण औरंगाबाद जिल्हयासाठी (शहरासह) लागू करण्यात येत आहेत.    
 
1.
अत्यावश्यक सेवा :
औरंगाबाद महानगरपालिकासह संपूर्ण जिल्हयात कोविड-19 च्या प्रसारास प्रतिबंधीत करण्यासाठी दिनांक 16 एप्रिल आणि 12 मे 2021 रोजीच्या आदेशातील अत्यावश्यक सेवा (Essential Category) मधील नमूद दुकाने ही आठवडयातील सर्व दिवस रोजी सकाळी 07.00 ते दुपारी 02.00 वाजेपर्यंत सुरु राहतील.
 
2.
बँक :
औरंगाबाद महानगरपालिकासह संपूर्ण जिल्हयात सर्व बँका कामाचे सर्व दिवस (Working Days) सुरु राहतील.
 
3.
अत्यावश्यक दुकानाव्यतिरिक्त इतर दुकाने  (Non Essential Shops) :
औरंगाबाद महानगरपालिकासह संपूर्ण जिल्हयात अत्यावश्यक दुकानाव्यतिरिक्त इतर दुकाने (Non Essential Shops-Stand alone shops and not inside Shopping Centres/Malls) सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते दुपारी 02.00 वाजेपर्यंत सुरु राहतील.  सर्व Shopping Centres/मॉल बंद राहतील.
 
4.
4.1
घरपोच सेवा सुविधा :
 रेस्टॉरंट/हॉटेल,,बार व मद्य विक्रीची दुकाने ही फक्त पार्सल / घरपोच सेवेसाठी दिनांक 16 एप्रिल आणि 12 मे 2021  रोजीच्या आदेशानुसार सुरु राहतील.
 
4.2
औरंगाबाद महानगरपालिकासह संपूर्ण जिल्हयात ई-कॉमर्स मार्फत अत्यावश्यक वस्तु व सेवा तसेच, अत्यावश्यक व्यतिरिक्त (Essential / Non-essential) यांची घरपोच सेवा (Home Delivery) सुरु करणेस मुभा राहिल.
 
5.
वैद्यकीय सेवा : अत्यावश्यक कारण :
औरंगाबाद महानगरपालिकासह संपूर्ण जिल्हयात दररोज दुपारी 3.00 वाजेनंतर वैद्यकीय सेवा व इतर अत्यावश्यक कारण (Valid Reason)/ अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यास संपूर्णपणे प्रतिबंध (संचारबंदी) राहिल. तसेच, घरपोच सेवा देण्यास यापूर्वी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशानुसार परवानगी राहिल. 
 
6.
शासकीय / निमशासकीय कार्यालये :
औरंगाबाद महानगरपालिकासह संपूर्ण जिल्हयात सर्व शासकीय कार्यालये (अत्यावश्यक /कोरोना विषयक कामकाज करणा-या कार्यालयाव्यतिरिक्त ) 25% अधिकारी/कर्मचारी उपस्थितीत सुरु राहतील.
 
7.
कृषि आस्थापना :
कृषि संबधीत दुकाने आणि त्यांच्याशी संबधीत आस्थापना (बी-बियाणे, खते, उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी) तसेच, कृषी उत्पन्न बाजार समिती हे आठवडयातील सर्व दिवस सकाळी 7.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत सुरु राहतील.
 
8.
मालवाहतुक इ. :
माल वाहतूक व मालाचा पुरवठा संबधीत दुकानदार/आस्थापनेस करण्याकरिता वेळेचे कोणतेही निर्बंध नाहीत मात्र अशा दुकानदार/आस्थापना यांनी कोणत्याही परिस्थितीत माल साठवणूक करतांना या कालावधीत मालाची विक्री करु नये, मालाची विक्री होत असल्याचे आढळून आल्यास संबधीतांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
 
 
9.
वरील आदेशाव्यतिरिक्त इतर बाबींसाठी या कार्यालयाचे दि.14/04/2021, दि.16/04/2021, दि.18/04/2021, दि.20/04/2021, दि.22/04/2021, दि.30/04/2021, दि.14/05/2021 व दि.16/05/2021 रोजी निर्गमित केलेले आदेश/मार्गदर्शक सूचना लागू राहतील.
 
 
विशेष सूचना :
1.  ज्या आस्थापना/दुकाने दुपारी 2.00 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिलेली आहे त्यांनी दुपारी 2.30 पर्यंत अथवा तत्पूर्वी अनिवार्य सर्व हिशोब व इतर कार्यवाही पूर्ण करुन दुकाने/आस्थापना बंद करावी. या संबंधी उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास सदरील दुकाने/आस्थापना Covid-19 Pandemic संपेपर्यंत सील (Seal) करण्यात येतील याची नोंद घ्यावी.
2.  यापूर्वी Covid-19 Pandemic मध्ये नियमबाहय कृतीबद्दल बंद (Seal) केलेल्या आस्थापना त्यांची सुनावणीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच उघडल्या जातील.  या सुनावणीचे अधिकार 1. सहाय्यक आयुक्त, कामगार 2. सहाय्यक आयुक्त, अन्न व सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन व जिल्हाधिकारी यांना राहतील.
 
सदर आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अंमजबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीत आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 तसेच साथरोग कायदा 1897 अन्वये दंडनीय/कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहील असेही जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.