राज ठाकरेंचे ‘मनसे”सैनिकांना पत्र 

१४ जून रोजी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय


मुंबई:
 करोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्राद्वारे आपल्या मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. जोपर्यंत कोरोनावर योग्य औषध सापडत नाही तोपर्यंत आपल्याला कोरोनासोबत जगण्याची तयारी मनाने करायला हवी. सध्या एकूणच महाराष्ट्राने तशी तयारी केलेली दिसत असल्याचं देखील त्यांनी यावेळी पत्रात म्हटलं आहे. १४ जून रोजी राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे.   

Image
राज ठाकरेंचे पत्र असे: 

माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना,

सस्नेह जय महाराष्ट्र.

आज खूप दिवसांनी माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांशी मी पुन्हा थेट संवाद साधतोय ह्याचा मला मनापासून आनंद होत आहे. मार्च महिन्यात कोरोनाचं संकट राज्यावर आणि देशावर येऊन कोसळलं आणि उत्तरोत्तर ते अधिक गडद होत गेलं. आजही त्याची तीव्रता कमी झाली आहे असं नाही. पण मागे मी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत म्हटलं होतं त्याप्रमाणे जोपर्यंत ह्या आजारावर योग्य औषध सापडत नाही तोपर्यंत आपली कोरोना साथीसोबत जगण्याची तयारी मनाने करावी लागेल आणि सध्या एकूणच महाराष्ट्राने तशी तयारी केलेली दिसते.

गेल्या २, ३ महिन्यांच्या काळात येणाऱ्या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या होत्या. फक्त त्यात एकच दिलासा देणारी बाब माझ्यासाठी असायची ती म्हणजे ह्या कठीण प्रसंगात माझा महाराष्ट्र सैनिक जीवावर उदार होऊन, मोठ्या प्रमाणावर पदरमोड करून, लोकांच्या मदतीला धावून जातोय ही. अन्नधान्य वाटपापासून ते रुग्णांना इस्पितळात बेड मिळवून देणाऱ्या ते रुग्णाच्या कुटुंबियांना धीर देऊन प्रत्येकाच्या गरजेला उभा राहणाऱ्या माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या बातम्या माझ्यापर्यंत पोहचायच्या आणि त्या ऐकताना मला एकाच वेळेस आनंद आणि अभिमान दोन्हीही वाटत रहायचा.

महाराष्ट्र सैनिकांनी ह्या काळात केलेल्या कामाचं कौतुक मला अनेक लोकांनी व्यक्तिशः कळवलं, मी मनापासून सांगतो की मी खरंच भाग्यवान आहे की मला तुमच्यासारखे सहकारी मिळाले. बरं, हे करत असताना रोज माझा महाराष्ट्र सैनिक स्वतःचा आणि त्याच्या कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालत होता, कित्येक महाराष्ट्र सैनिकांना कोरोनाची लागण देखील झाली तरीही ना माझा महाराष्ट्र सैनिक मागे हटला ना त्याचे कुटुंबीय. ही ताकद येते ती महाराष्ट्रावरच्या निस्सीम आणि निर्व्याज प्रेमातून. तुमच्या ह्या ताकदीला आणि तुमच्या कुटुंबियांच्या धैर्याला आणि त्यागाला माझा सलाम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *