बीडला अवकाळी पावसाने झोडपलं,भर उन्हाळ्यात बीड जिल्ह्यात पावसाचे थैमान

बीड,९ मे /प्रतिनिधी 

बीडमधील धारूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला.आज दुपारी धारूर तालुक्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. भर उन्हाळ्यात म्हणजे मे महिन्यात लेंढी नदीला पूर आला. ज्यामुळे अनेक झाडं मोडली गेली, तर काही जणांच्या घरावरील पत्रे उडुन गेले ज्यामुळे लोकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाही.जाहागीर मोहा येथे शेतीची मशागत करण्यासाठी गेलेला टेलर व जीप नदीच्या प्रवाहात वाहून गेले फळबागांचेही नुकसान झाले. 

भर उन्हाळ्यात बीड जिल्ह्यात पावसाचे थैमान

गेल्या दोन दिवसापासून बीड जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळाले, अशात आज दुपारी जोरदार पाऊस झाल्याने हजेरी लावली, ज्यामुळे काही शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले, तर काही शेतकऱ्यांना याचा फायदा झाला. कारण ज्यांचे पीक काढणीला आले होते त्यांचे नुकसान झाले आहे. तर ज्या शेतकऱ्यांना शेतीला सुरवात करायचा होती त्यांना या पावसामुळे लवकर शेती करता येणे शक्य होणार आहे. यामुळे काही शेतकरी वर्ग खुश झाला आहे. या पावसामुळे शेतकरी वर्गात ‘कही खुशी कही गम’ अशी अवस्था झाली आहे. यापावसामुळे अंब्याचे तसेच भाजीपाल्याचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .

हवामान खात्याने पुढील 24 तासांमध्ये कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता वर्तवली आहे.