औरंगाबादेत संचारबंदींच्या  कालवधीमध्ये 15 एप्रिल पर्यंत वाढ,3 एप्रिल आणि रविवार 4 एप्रिल रोजी असणारा कडक लॉकडाऊन लागू राहणार

औरंगाबाद दि. 02 : राज्य शासनाच्या आदेशानुसार MISSION BEGIN AGAIN अंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात काही निर्बंध सुकर करण्‍यासहसंचारबंदीचा कालावधी वाढविण्‍यात आलेला असून औरंगाबाद जिल्ह्यासाठी (शहर व ग्रामीण) लागू केलेले मनाई आदेश यापुढे दिनांक 15 एप्रिल रोजी  24.00 वाजेपर्यंत (रात्री 8.00 ते सकाळी 7.00) या कालावधीसाठी संचारबंदी/मनाई आदेश लागू राहणार आहेत. शनिवार दि 3 एप्रिल आणि रविवार 4 एप्रिल रोजी असणारा कडक लॉकडाऊन लागू राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. आणि   

कोव्‍हीड-19 च्‍या व्‍यवस्‍थापनासाठी परिशिष्‍ठ-1  मध्‍ये निर्दिष्‍ठ केलेले राष्‍ट्रीय मार्गदर्शक तत्‍वांचे संपूर्ण औरंगाबाद जिल्‍हयात अनुपालन करणे सर्वांना बंधनकारक आहे.  यापूर्वी मान्‍यता दिलेल्‍या बाबी/व्‍यवहार आणि परिशिष्‍ठ-2 मध्‍ये नमूद केलेल्‍या  बाबी/व्‍यवहार सुरु राहतील आणि आधीचे सर्व आदेश या आदेशाशी संलग्‍न राहतील आणि ते यापुढे दिनांक 15 एप्रिल 2021 पर्यंत लागू राहतील.

परिशिष्‍ट-1 

पुनश्‍चः प्रारंभ अभियान (MISSION BEGIN AGAIN)

कोविड-19 च्‍या व्‍यवस्‍थापनाबाबतचे राष्‍ट्रीय निर्देश

1.   चेहरा झाकणे– सार्वजनिक ठिकाणी, कामाच्‍या ठिकाणी व प्रवास करतांना, चेहरा झाकणे अनिवार्य आहे.

2.   सामाजिक अंतर राखणे- सार्वजनिक ठिकाणी, सर्व व्‍यक्‍तींनी कमीत कमी 6 फुट (2 गज की दूरी) इतके अंतर राखले पाहिजे.

दुकानदार, ग्राहकांमध्‍ये शारीरिक अंतर राखण्‍याची सुनिश्चिती करतील आणि एकावेळी पाचपेक्षा अधिक व्‍यक्‍तींना मुभा देणार नाहीत.

3.   सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हे, संबंधित स्‍थानिक प्राधिकरणाव्‍दारे, त्‍यांचे कायदे , नियम, विनियम यांनुसार विहित करण्‍यात येईल अशा दंडाच्‍या शिक्षेस पात्र असेल.

4.  सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, पान, तंबाखु, इत्‍यादींच्‍या सेवनास मनाई आहे.

कामाच्‍या ठिकाणांबाबतचे अतिरिक्‍त निर्देशः

5.  घरातून काम करणे –शक्‍य असेल तेथवर, घरुन काम करण्‍याची पध्‍दत अनुसरण्‍यात यावी.कार्यालये , कामाची ठिकाणे, दुकाने, बाजारपेठा आणि औद्योगिक व वाणिज्यिक आस्‍थापना यांमध्‍ये कामाच्‍या/कामकाजाच्‍या वेळांची सुनियोजितपणे आखणी करावी.

6.   परीक्षण (स्‍क्रीनिंग) व स्‍वास्‍थ्‍य – औष्णिक परीक्षण (थर्मल स्‍कॅनिंग),  हात स्‍वच्‍छ करण्‍याचे द्रव्‍य (हॅंडवॉश) व निर्जंतुकीकरण द्रव्‍य (सॅनिटायझर) हे सर्व प्रवेशव्‍दाराजवळ व निर्गमन व्‍दाराजवळ आणि सामाईक क्षेत्रांत पुरविण्‍यात यावे.

7.  वारंवार निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) – संपूर्णकामाच्‍या ठिकाणाचे, सामाईक सुविधांचे व मानवी संपर्कात येणा-या सर्व जागा यांचे, उदाहरणार्थ दरवाजांच्‍या मुठी (डोअर हॅण्‍डल) , इत्‍यादींचे कामाच्‍या पाळयांमध्‍ये वारंवार निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) करण्‍याची सुनिश्चिती करण्‍याची दक्षता घ्‍यावी.

8.   सामाजिक अंतर राखणे- कामाच्‍या ठिकाणांच्‍या सर्व प्रभारी व्‍यक्‍ती, कामागारांमध्‍ये पुरेसे अंतर राखणे, कामाच्‍या पाळयांदरम्‍यान पर्याप्‍त अंतर ठेवणे, दुपारच्‍या जेवणाच्‍या वेळेत पुरेसे अंतर राखणे, इत्‍यादींव्‍दारे सामाजिक अंतर राखण्‍याची दक्षता घेतील.

                                        परिशिष्‍ट-2

पुनश्‍चः प्रारंभ अभियान (MISSION BEGIN AGAIN)

1.                   प्रतिबंधीत क्षेत्रे –   

                      i.      स्थानिक प्रशासनाने घोषित केलेली प्रतिबंधीत क्षेत्रे पुढील आदेशा पर्यंत कायम राहतील.   

                    ii.      प्रतिबंधीत क्षेत्र निश्‍चित करण्‍याबाबत व त्‍यातील क्रियाबाबत केंद्र शासन व राज्‍य शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले मार्गदर्शक तत्‍वे पुढील आदेशापर्यत लागू राहतील.

                 iii.      साथरोगाचा प्रसार थांबविण्‍यासाठी स्‍थानिक परिस्थिती पाहून जिल्‍हाधिकारी अथवा  महानगरपालिका आयुक्‍त हे स्‍थानिक क्षेत्रात परवानगी असलेले परंतु अत्‍यावश्‍यक नसलेल्‍या गतीविधीना तसेच लोकांच्‍या हालचालीस मा. मुख्‍य  सचिव, महाराष्‍ट्र शासन यांचे लेखी पूर्व परवानगीने प्रतिबंधीत करु शकतील.

      Iv प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये सकारात्मक चाचणी आलेल्या सर्व व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची यादी तयार करणे, त्यांचा मागोवा घेणे, त्यांची ओळख पटवणे, त्यांचे अलगिकरण करणे आणि त्यांचा 14 दिवसांपर्यंत पाठपूरावा करणे. (विषाणू संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींपैकी  80% व्यक्तींना 72 तासांमध्ये शोधून काढणे.)

2.    औरंगाबाद जिल्ह्यात दिनांक 27/03/2021 मध्यरात्रीपासून लागू असणाऱ्या प्रतिबंध आदेशाने रात्री 08.00 वा. ते सकाळी 07.00 वा. पर्यंत 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येणेस मज्जाव असेल. याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती रक्कम रु. 1000/- (प्रती व्यक्ती) दंडास पात्र राहतील.

3.    औरंगाबाद जिल्ह्यात दिनांक 27/03/2021 मध्यरात्रीपासून लागू असणाऱ्या प्रतिबंध आदेशाने रात्री 08.00 वा. ते सकाळी 07.00 वा. पर्यंत सर्व सार्वजनिक ठिकाणे (बगिचे/उद्याने) बंद राहतील. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती रक्कम रु. 1000/- (प्रती व्यक्ती) दंडास पात्र राहतील.

4.   मास्क परिधान  केलेली व्यक्ती आढळल्यास रक्कम रु. 500/- दंडास पात्र राहील. सार्वजनिक ठिकाणी कोणतीही व्यक्ती थुंकताना आढळल्यास रक्कम रु1000/- दंडास पात्र राहिल.

5.    औरंगाबाद जिल्ह्यात दिनांक 27/03/2021 मध्यरात्रीपासून लागू असणाऱ्या प्रतिबंध आदेशाने रात्री 08.00 वा. ते सकाळी 07.00 वा. पर्यंत सर्व सिनेमा हॉल (सिंगल स्क्रिन व मल्टीप्लेक्सेस) मॉल्स, सभागृहे आणि रेस्टॉरंटस् बंद राहतील. तथापी सदर कालावधीत रेस्टॉरंट मधून होम डिलीव्हरी व पार्सल सुविधा देणेस परवानगी असेल.

सदर आदेशाचा भंग केल्यास तसेच यापूर्वीच्या आदेशातील अटी शर्तींचा भंग केल्याससंबंधित सिनेमागृहे (सिंगल स्क्रिन आणि मल्टिप्लेक्सेस), हॉटेल्स / रेस्ट्राँरंटस ही कोव्हीड -19 विषाणु संसर्ग केंद्र सरकारने आपत्ती म्हणून अधिसूचित केले असेपर्यंत बंद राहतील. तसेच संबंधित आस्थापना मालक हे आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत दंड वसूल करणेस पात्र राहतील. 

6.    कोणतेही सामाजिक / सांस्कृतिक / राजकीय / धार्मिक कार्यक्रम, सभा, मोर्चे, मिरवणूका, संमेलने तसेच यात्रा, उत्सव, उरुस इ.चे आयोजन करणेस परवानगी असणार नाही. सभागृहे व नाटयगृहे देखील सदर कार्यक्रम / मेळावे / सभा यांचे आयोजन करणेस वापरु नयेत. सदर आदेशाचा भंग केल्यास, संबंधित कार्यक्रमाचे आयोजक/ जागा मालक हे आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत दंड वसूल करणेस तसेच फौजदारी कारवाईस पात्र राहतील. तसेच संबंधित सभागृहे / इतर ठिकाणे ही कोव्हीड -19 विषाणु संसर्ग केंद्र सरकारने आपत्ती म्हणून अधिसूचित केले असे तोपर्यत बंद केली जातील.

7.   विवाह समारंभ कार्यक्रमास फक्त 50 नागरिकांना उपस्थित राहणेस परवानगी असेल तथापि लग्‍न समारंभापूर्वी संबंधित अर्जदार यांनी संबंधित स्थानिक प्राधिकरणाकडे (मनपा/नपा/नगर पंचायत/ग्रा.प.)   विवाह समारंभास उपस्थित राहणा-या व्‍यक्‍तींचे नाव, पत्‍ते, मोबाईल नंबर देणे बंधनकारक राहिल. कारण अशा कार्यक्रमांमधून जर कोरोना या आजाराची लागण झाली, तर सदरील व्‍यक्‍तींची Contact Tracing करणे सोपे होईल. नागरिकांचे प्रशासनास याबाबत सहकार्य अपेक्षित आहे. सदर आदेशाचा भंग केल्यास, संबंधित कार्यक्रमाचे ठिकाण / हॉल मालक हे आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत दंड वसूल करणेस पात्र राहतील. तसेच संबंधित ठिकाणे / हॉल ही कोव्हीड -19 विषाणु संसर्ग केंद्र सरकारने आपत्ती म्हणून अधिसूचित केले असे तोपर्यत बंद केली जातील.

8.    अंतिम विधी / अंत्ययात्रा इत्यादी कार्यक्रमामध्ये सहभागी होणेस फक्त 20 नागरिकांना परवानगी असेल. अशा प्रसंगांमध्‍ये संबंधित स्थानिक प्राधिकरण (मनपा/नपा/नगर पंचायत/ग्रा.प.)यांनी अशा प्रसंगी उपसस्थित राहणा-या व्‍यकतींचे नाव, पत्‍ते, मोबाईल नंबर देणे बंधनकारक राहिल. कारण अशा कार्यक्रमांमधून जर कोरोना या आजाराची लागण झाली, तर सदरील व्‍यक्‍तींची contact tracing करणे सोपे होईल. नागरीकांचे  प्रशासनास याबाबत सहकार्य अपेक्षित आहे. या अटीचे पालन केले जात असलेबाबत खात्री करणे.

9.     गृह अलगीकरणास खालील प्रतिबंधास अधिन राहून परवानगी असेल —

I)गृह अलगिकरण झालेल्या नागरिक / रुग्णांविषयीची माहिती संबंधित स्थानिक प्राधिकरण यांना कळविणे. तसेच तसेच गृह अलगीकरण व्यक्ती ही कोणत्याही वैद्यकीय                          व्यावसायिकाच्या (डॉक्टर ) यांचे देखरेखीखाली आहे याची देखील माहिती स्थानिक प्रशासनास (मनपा/नपा/नगर पंचायत/ग्रा.प.) देणे बंधनकारक असेल.
II)कोव्हीड -19 रुग्ण असलेल्या ठिकाणी सुरवातीच्या दिवसापासून 14 दिवसापर्यत दर्शनी ठिकाणी फलक लावावा लागेल, जेणेकरून त्या ठिकाणी कोव्हीड -19 रुग्ण असलेची माहिती नागरिकांना होईल.
III)कोव्हीड -19 + Ve रुग्णांच्या हातावर गृह अलगीकरण (Home Quarantine) असा शिक्का मारणे.
IV)सदर कोव्हीड -19 रुग्ण गृह अलगीकरण केलेल्या ठिकाणी संबंधित कुटुंबातील व्यक्तीनीही कमीत कमी संपर्क ठेवावा. तसेच मास्क परिधान केलेशिवाय सदर ठिकाणी प्रवेश केला जाणार नाही, याविषयी दक्षता घेणेत यावी.                                                                                                                   
V)गृह अलगीकरणाची कोणत्याही प्रकारचे उल्लंघन झालेस सदर कोव्हीड -19 रुग्ण किंवा अलगीकरण झालेले नागरीक यांना स्थानिक प्रशासनाने सुरु केलेल्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये (CCC) मध्ये स्थंलातरीत केले जाईल.

10.     सर्व खाजगी कार्यालये / आस्थापना (आरोग्य व इतर अत्यावश्यक असलेल्या आस्थापना वगळता)  ही 50 % क्षमतेच्या अधिन राहून सुरू राहतील. सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या कार्यालय प्रमुखाने कर्मचारी उपस्थितीबाबत कोविड-19 प्रादुर्भाव व्यवस्थापनाच्या अनुषंगाने योग्यतो निर्णय घ्यावा. सर्व उत्पादन करणाऱ्या आस्थापना पूर्ण क्षमतेने कार्यरत राहतील. परंतु अशा आस्थापनांनी प्रत्यक्ष उत्पादनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये सामाजिक अंतर राखले जाण्यासाठी आवश्यकते प्रमाणे कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी ठेवणेबाबत सूचित करणेत येत आहे. वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या घटकातील कर्मचाऱ्यांमध्ये सामाजिक अंतर राखणेसाठी स्थानिक प्राधिकरणाने (मनपा/नपा/नगर पंचायत/ग्रा.प.) मान्यता दिल्या प्रमाणे अशा घटकांना कामांच्या पाळ्या वाढविण्याची मुभा असेल. अशी उत्पादन क्षेत्रे खालील बंधनांचे पालन करुन सुरु राहतील.

            I.        मास्क परिधान केल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही . (NO Mask – No Entry)

                II.            सर्व ठिकाणी तापमापीचा (Thermal Gun/Thermometer) उपयोग करून शरीराच्या तापमानाची नोंद घेणेत यावी, जेणेकरून ताप असलेल्या कोणत्याही व्यक्तीला प्रवेश दिला जाणार नाही.

             III.            प्रवेशव्दार तसेच इतर ठिकाणी पुरेशा प्रमाणात हँड सॅनिटायझर  ठेवणेत यावीत.

   IV.    सर्व आस्थापनांच्या मध्ये तपासणीसाठी (Screening )पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ नियुक्त करावे,   

         जेणेकरून सर्व अभ्‍यागतांबाबत मास्क परिधान केला जाईल, सामाजिक अंतर राखले जाईल

         याविषयी तपासणी केली जाईल

V.               या आदेशाचा उल्लंघन करणारे संबंधीत घटक हे आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत दंड वसूल करणेस तसेच फौजदारी कारवाईस पात्र राहतील. तसेच संबंधित आस्थापना ही कोव्हीड -19 विषाणु संसर्ग केंद्र सरकारने आपत्ती म्हणून अधिसूचित केले असे तोपर्यत बंद केली जातील

11. शासकीय कार्यालयामध्ये गर्दी कमी करण्यासाठी, निवडून आलेले लोकप्रतिनिधी वगळून इतर

अभ्यागतांना तातडीच्या कामाशिवाय शासकीय कार्यालयामध्ये प्रवेश करणेस परवानगी असणार नाही. ज्या अभ्यागतांना बैठकीसाठी बोलविण्यात आलेले आहे त्यांच्या बाबतीत विभाग / कार्यालय प्रमुख यांनी विशेष पास निर्गमीत करणेत यावेत.

सर्व धार्मिक ठिकाणच्या व्यवस्थापन करणाऱ्या विश्वस्त यांनी संबंधित धार्मिक ठिकाणच्या परिसरामध्ये उपलब्ध असणारी जागा  आणि पुरेसे सामाजिक अंतर राखले जाणेच्या दुष्टीकोनातून दर तासाला किती भाविकांना प्रवेश देणेत येईल या संख्येची निश्चिती करून प्रसिध्द करणे.  भाविकांसाठी ऑनलाईन आरक्षण किंवा इतर सोयीच्या पध्दतींचा वापर करणे स्‍वागतार्ह. वरील ठिकाणी फक्त खालील प्रतिबंधास अनुसरून प्रवेश दिला जाईल. ( धार्मिक ठिकाणाच्‍या बाबतीत संबंधित देवस्‍थानाचे विश्‍वस्‍त/ टूस्‍ट/अध्‍यक्ष यांनी स्‍वतंत्र कार्यपध्‍दती निश्चित करुन संबंधित मनपा/नपा/नगर पंचायत/ग्रा.प. तसेच या कार्यालयास अवगत करावे.

I)मास्क परिधान केल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही . (NO Mask – No Entry)
II)सर्व ठिकाणी तापमापीचा उपयोग करून शरीराच्या तापमानाची नोंद घेणेत यावी, जेणेकरून ताप असलेल्या कोणत्याही व्यक्तीला प्रवेश दिला जाणार नाही.
III)प्रवेशव्दार तसेच इतर ठिकाणी पुरेशा प्रमाणात हँड सॅनिटायझर  ठेवणेत यावीत.
IV)सर्व आस्थापनांच्या मध्ये पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ नियुक्त करावे, जेणेकरून सर्व अभ्यांगताबाबत मास्क परिधान केला जाईल, सामाजिक अंतर राखले जाईल याविषयी तपासणीकेली जाईल.                       

13.                            ठराविक निर्बंधासह सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु करणेत आलेली आहे. याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संबंधीत सार्वजनिक परिवहन प्राधिकरणाद्वारे रक्कम रु. 500/- दंडास पात्र राहतील.

14.              यापूर्वी वेळोवेळी परवानगी दिलेल्या व प्रतिबंधित केलेल्या बाबी / क्षेत्रे कायम राहतील आणि यापूर्वी दिलेले आदेश सदर आदेशास संलग्न राहतील आणि सदरचे आदेश दिनांक 30/04/2021 पर्यंत अस्तित्वात राहतील. (परंतु शासन निर्देशानुसार 15 एप्रिल 2021 पर्यंत रात्री 08.00 वाजल्‍यापासून ते सकाळी 7.00 वाजेपर्यंतच्‍या कालावधीकरीता रात्रीची संचारबंदी लागू राहिल.)

15.          RTPCR चाचण्यांचे प्रमाण विशेष प्रयत्न करुन 70% किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात वाढवण्यात यावेत.

16.                            कोविड-19 सकारात्मक व्यक्तींचे संपर्क शोधणे – सकारात्मक चाचणी आलेल्या व्यक्तींचे लवकरात लवकर अलगीकरण करणे, त्याचे संपर्क शोधून काढून त्यांचे अलगीकरण करणे, बंधनकारक असेल. अशा संपर्कातील व्यक्ती किंवा कोविड-19 बाधीत रुग्णास गृह अलगिकरणासाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्यास संस्थात्मक अलगीकरणात राहणे बंधनकारक करणेत येत आहे.

17.                           विहीत केलेल्या प्रतिबंधात्मक उपाय योजना, चाचण्या आणि रुग्ण संपर्क शोधणे याची तंतोतंतअंमल बजावणी करणेची जबाबदारी संबंधीत नगरपालिका/नगर पंचायत/जिल्‍हा परिषद/पंचायत समिती/ग्राम पंचायत व पोलीस प्रशासन यांची असेल.उपरोक्‍त आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) याच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असेही आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.